भाजपची हुकूमशाही टिकणार नाही

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा : आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत होता, पण भाजप सरकारच्या काळात आश्‍वासनाशिवाय काहीही मिळत नाही. राज्यकर्ते सरकार चालविण्याच्या योग्यतेचे नाहीत. दुधाचा दर १७ रुपये, तर पाण्याची बाटली २० रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. या सरकारने शेतकऱ्यांची वाताहात करून सोडली आहे. हिटलरची हुकूमशाही फार दिवस चालली नाही तर भाजपची काय चालणार, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. आरफळ (ता. सातारा) येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन, तसेच शेतकरी मेळाव्यात अजित पवार बोलत होते. या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, माजी सभापती किरण साबळे पाटील, पंचायत समिती सभापती मिलिंद कदम उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखवले आहे. अनेक निकष लावल्यामुळे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिला आहे. ३५ हजार कोटींची कर्जमाफी भाजपने जाहीर केली, पण एकाही शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेले नाही. सरकारला याबाबत विचारणा केली असता अजून अभ्यास सुरू असल्याचे सांगितले जात आहे. समिती निवडणार, चौकशी करतो अशी उत्तरे दिली जात आहेत. कर्जमाफीसाठी देशात पहिल्यांदाच शेतकऱ्यांचा संप झाला. भाजपने तीन वर्षांत दीड लाख कोटी कर्ज वाढविले आहे. तरुणांना नोकऱ्या देण्याचे अमिष आणि सहकारी संस्था मोडीत काढायला हे सरकार निघाले आहे. सरकारचा हा दहशतवाद जास्त काळ टिकणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com