पावसाच्या वेगवेगळ्या नोंदीने शेतकरी चक्रावले !

पावसाच्या वेगवेगळ्या नोंदीने शेतकरी चक्रावले !
पावसाच्या वेगवेगळ्या नोंदीने शेतकरी चक्रावले !Agrowon

पुणे : राज्यात एकाच ठिकाणी पडलेल्या पावसाच्या दोन वेगवेगळ्या नाेंदी हाेत असल्याने शेतकरी चक्रावले आहेत. धक्कादायक म्हणजे या नोंदींमधील पावसाच्या प्रमाणात प्रचंड मोठी तफावत अाहे. त्यामुळे पाऊस नेमका खरा मानायचा कोणाचा, असा प्रश्‍न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

हवामान आधारित फळपीक विम्याकरिता कृषी विभागातील नोंदी ग्राह्य धरण्यात येत असल्याने नोंदीतील चुकांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाची भारतीय हवामान विभाग आणि राज्य सरकारचा कृषी विभाग यांच्याकडे स्वतंत्र नोंद होत असते.

कृषी विभागाकडून राज्यातील २०६५ कृषी मंडळामध्ये दररोज २४ तासांत होत असलेल्या पावसाची घेतली जाते. कृषी विभागाकडून १९९८ पासून ही सेवा सुरू करण्यात आली असून, २०१३ पासून मंडळनिहाय २४ तासांत पडलेल्या पावसाची आकडेवारी दररोज अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. यापुढे जाऊन राज्य सरकारने मोबाईल अॅपद्वारे घरबसल्या त्यांच्या मंडळातील पावसाची आकडेवारी मिळण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे.

शेतकरी या पावसाची नोंद त्यांच्याकडे संकलीत करून ठेवतात. त्यानुसार त्यांचे पीक नियाेजन आणि भविष्यात नुकसान झाल्यास या माहितीची मदत होत असते. केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागातर्फे सरकारला पावसाच्या दीर्घकालीन अंदाज देण्याबरोबर अतिवृष्टी, गारपीट, तापमानातील वाढ, घट यांच्या नाेंदी घेतल्या जातात.

बहुतांशी ठिकाणी महसूल विभागाच्या तहसील कार्यालयात असलेल्या पर्जन्यमापकात नोंदलेल्या पावसाची आकडेवारी हवामान विभागाकडे येते. त्यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धोरणे ठरविण्यात येतात. या दोन्ही सरकारी यंत्रणांकडून एकच ठिकाणी नोंदविलेल्या पावसाच्या प्रमाणात मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत पाऊसमानाच्या आकडेवारीची तफावत अधिक वाढली आहे.

कृषी विभागाच्या नाेंदी म्हणजे तोंडावर बोट शुक्रवारी सकाळपासून कोकणात पावसाने जोर धरला आहे. मॉन्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी धुव्वाधार पाऊस झाला आहे. तशी नोंद हवामान विभागाकडे झाली. मात्र कृषी विभागाकडील नोंदी पाहून तोंडावर बोट ठेवावे अशी स्थिती आहे.

राज्यातील इतरही ठिकाणांच्या पावसात मोठी तफावत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शनिवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदला गेलेल्या पावसाची निवडक आकडेवारी पाहता, आम्ही केलेल्या तक्रारींचा पुरावा एक प्रकारे मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

साटेलोटे? अतिवृष्टी, अवेळी पाऊस, पावसात पडणारे खंड, गारपीट यांसारख्‍या आस्मानी संकटांमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी या पावसाच्या नोंदी उपयुक्त ठरतात. शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ‘पीक विमा’ योजनेतून कवच दिले जाते.

विमा कंपन्या लाभ देताना कृषी विभागाकडे नोंद झालेल्या पावसाच्या मंडलनिहाय आकडेवारीचा विचारात घेतात. त्यामुळे चुकीची आकडेवारी गोळा करून, पीकविमा कंपन्यांचे हित साधले जात असल्याचेच आणि साटेलोटे असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी बोलून दाखविल्या.

Agrowon
AgrowonAgrowon

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com