उद्योगपतींना पॅकेज; मग शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का?

उद्योगपतींना पॅकेज; मग शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का?
उद्योगपतींना पॅकेज; मग शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का?

पुणे : देशातील साखर कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र सरकारकडून उद्योगपतींसाठी पॅकेज आणि एनपीएतून वाचविण्यासाठी बॅंकांना सरकारी तिजोरी मोकळी केली जाते. दुसरीकडे अडचणीतील साखर कारखान्यांना डावलून शेतकऱ्यांची मुस्कटदाबी का केली जात आहे, असा रोखठोक सवाल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे. ‘‘साखर कारखान्यांना एफआरपीपोटी शेतकऱ्यांना २५०० रुपये द्यावे लागत आहेत. त्यात पुन्हा इतर खर्च बघता अजून एक हजार रुपये टाकून कारखान्यांना एकूण ३५०० रुपयांनी साखर तयार करावी लागत आहेत. या साखरेला बाजारात मात्र २८०० रुपये दर मिळतो आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे पुढील हंगामात काही कारखाने चालूच होणार नाहीत. याचा मोठा फटका ऊस उत्पादक शेतकरी व ग्रामीण अर्थकारणावर होईल,’’ असे श्री. वळसे यांनी बोलताना स्पष्ट केले.   अडचणीत सापडलेल्या साखर कारखाना उद्योगाबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघ तसेच इस्मानेदेखील केंद्र सरकारकडे समस्या कथन केली आहे. कारखान्यांसमोर उद्भविलेल्या अडचणींबाबत केंद्राने हालचाली सुरू केल्या आहेत. हा विषय गांभीर्याने घेतल्याचेही दिसत आहे. मात्र अजून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनाच आम्ही साकडे घालून शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारसोबत चर्चा करण्याची विनंती करणार आहोत. अर्थसंकल्पानंतर श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे कारखान्यांच्या अडचणी मांडल्या जाणार आहेत, असे श्री. वळसे म्हणाले. 

साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी निर्यात अनुदान देणे, आयात साखरेवर करवाढ लावणे, किमान २० लाख टनाचा बफर स्टॉक करणे असे तातडीचे धोरणात्मक निर्णय केंद्र सरकारने घ्यायला हवेत, असा आग्रह श्री. वळसे यांनी धरला आहे.  साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे, तेथे तोट्याची भाषा नको   साखर कारखान्यांबाबत सरकारची भूमिका नकारात्मक असते. तोटा होतो म्हणून कारखान्यांची वीज खरेदी केली जात नाही. साखर कारखाने हे शेतकऱ्यांचे असून, कारखाने ग्रीन पॉवर तयार करतात. कारखान्यांचा लाभ देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला, पर्यावरणाला आणि शेतकऱ्यांना मिळतो. त्यामुळे कारखान्यांशी व्यवहार करताना नफा-तोट्याची भाषा करू नये. कर्जबुडव्या उद्योगपतींसाठी ८० हजार कोटीची मदत करतात मग शेतकऱ्यांना मदतीसाठी हात का आखडतात, असा सवाल श्री. वळसे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com