घटनादुरुस्तीनंतरचे कायदे शेतकऱ्यांसाठी मारक : वामनराव चटप

माजी आमदार वामनराव चटप
माजी आमदार वामनराव चटप

शिर्डी, जि. नगर  ः शेतकऱ्यांसंबंधी केलेले कायदे शेतकऱ्यांना मारक आहेत. राजकीय सोयीसाठी शेतकऱ्यांवर अन्याय करणारी घटनादुरुस्ती केली गेली आहे. त्यामुळे सरकार बदलून उपयोग नाही तर घटनादुरुस्तीसाठी प्रयत्न करून मारक कायदे रद्द करण्यासाठी लढा उभारावा लागेल, असे मत शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप यांनी व्यक्त केले.

शिर्डी येथे सुरू असलेल्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त अधिवेशनात ‘शेतकरी विरोधी संविधान दुरुस्ती’ या विषयावर सोमवारी (ता. १०) चर्चासत्र झाले. शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप, ॲड. अनंत उमरीकर, ॲड. प्रकाश तिनपाठी, पत्रकार प्रमोद चंचुवार सहभागी झाले होते. ॲड. उमरीकर यांनी आतापर्यंत घटनादुरुस्ती कशाप्रकारे केली गेली आणि त्यावर न्यायालयाने काय काम केले यांची माहिती विशद केली तर चंचुवार यांनी घटना दुरुस्तीनंतर शेतकरी कायदे परिशिष्ठ ९ मध्ये टाकल्यावर कशाप्रकारे शेतकऱ्यांना न्यायापासून वंचित राहावे लागत आहे याची माहिती दिली.

माजी आमदार चटप म्हणाले, की घटना दुरुस्तीनंतर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. सध्या शेतकऱ्यांसाठी असलेले कायदे हे शेतकऱ्यांना मारक आहेत आणि हे कायदे राजकारणी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी व शेतकऱ्यांवर अन्याय करण्यासाठीच केले आहेत. सर्वच सरकारने शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या वाटा जवळपास बंद केल्या आहेत. त्यामुळे आता सरकार बदलून उपयोग नाही तर कायदे बदलण्याची गरज आहे. त्यासाठी लढा उभारावा लागेल, त्याशिवाय न्याय मिळणार नाही. धोरणं बदलण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com