सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत असंतोष : चव्हाण

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : केंद्र आणि राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेत प्रचंड असंतोष आहे. २०१९ हे वर्ष काँग्रेसचे राहणार असून, भाजपच्या घरवापसीचे असणार आहे. केंद्रात आणि राज्यात परिवर्तन करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. ते पालघर येथे काँग्रेसच्या जिल्हास्तरीय शिबिराला मार्गदर्शन करताना बोलत होते.

पालघर जिल्ह्यातील मनोर येथून काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबिरांना सुरवात झाली. या वेळी अशोक चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीका केली. केंद्र व राज्य सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिवर्तनासाठी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात १३ हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आत्महत्या वाढत आहेत. बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाच्या नावाखाली जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. शेतकऱ्याची जात संपवण्याचा विडा भाजप सरकारने उचलला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा या सरकारवर विश्वास राहिला नसून, सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही. देशाचे संविधान बदलण्याचा भाजप सरकारचा डाव असून, या विरोधात २६ जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष राज्यभरातील सर्व जिल्ह्यांत संविधान बचाव यात्रा काढणार आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com