जळगाव जिल्ह्यात पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल

पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल
पीककर्ज वाटपात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल

जळगाव : जिल्ह्यात खरिपासाठी पीक कर्जवाटपासंबंधी राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून चालढकल सुरू आहे. अद्याप फक्त पाच टक्केच पीक कर्ज या बॅंकांनी वितरित केल्याचे जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या आढाव्यातून समोर आले आहे. कर्जासाठी शेतकरी बॅंकांकडे वणवण फिरत आहेत. कर्जमाफीच्या लाभार्थींना तर कर्ज मिळेल की नाही, हादेखील प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला. मशागती पूर्ण होत आल्या, परंतु अजूनही बॅंकांनी हवा तसा वित्तपुरवठा खरिपासंबंधी केलेला नाही. कर्जमाफीचे अडीच लाख लाभार्थी शेतकरी नव्या कर्जापासून वंचित आहेत. त्यांचे व्याज, कर्जाची रक्कम शासनाने त्यांच्या कर्ज खात्यात अजूनही भरलेली नसल्याने बॅंका ही रक्कम बॅंक कशी भरणार, असे सांगून त्यांना परतावून लावत आहेत. हा प्रकार कुणीही गांभीर्याने घेत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात सेंट्रल बॅंक ही अग्रणी बॅंक असून, सर्वाधिक खरीप वित्तपुरवठ्याची जबाबदारी याच बॅंकेची आहे. तर सर्व राष्ट्रीयीकृत बॅंकांना मिळून सुमारे ६०० कोटी रुपये खरीप कर्जवितरण करायचे निश्‍चित आहे. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी १० जूनअखेर फक्त पाच टक्केच कर्ज वितरण केले आहे. नियमित कर्जदारांनाही कर्ज वितरण हव्या त्या गतीने सुरू नाही. बॅंक अधिकाऱ्यांच्या बदल्या अनेक ठिकाणी केल्या असून, नवे अधिकारी सर्व माहिती समजून घेण्यात व्यस्त आहेत. कर्ज वितरणाच्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत.  

जिल्हा बॅंकेकडून ३६० कोटींपर्यंत वाटप जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सर्वाधिक वित्तपुरवठा खरिपात करते. यंदाही अधिक वित्तपुरवठ्याची जबाबदारी या बॅंकेवर आहे. या बॅंकेने आतापर्यंत सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांना ३६० कोटी रुपये कर्जवाटप केल्याचे सांगण्यात येत आहे. अलीकडे कर्ज वितरणाची गती बॅंकेने वाढविली आहे. बॅंक सोसायट्यांना कर्ज देते. मग सोसायट्यांतर्फे शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. मध्यंतरी कर्ज मंजुरीसंबंधीचे तक्ते पूर्ण नव्हते. त्यामुळे कर्ज वितरण धीम्या गतीने सुरू होते. आजघडीला सर्व ८७७ विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचे कर्ज वितरणाचे तक्ते मंजूर आहेत. कर्ज वितरण या आठवड्यात आणखी गतीने होईल, अशी माहिती मिळाली.

बॅंका शेतकऱ्यांना कर्जवाटप करायला मागे पुढे पाहतात. त्यांना ताटकळत ठेवतात. कारण शेतकरी बॅंकेविरोधात बंड करू शकत नाहीत. बंड केले तर शेतकऱ्यांची सहज कोंडी करायचे प्रकार बॅंका करतात. या सर्व स्थितीत बॅंका पीक कर्ज वितरणासंबंधी गतीने काम करीत नसल्याची स्थिती आहे. - भगवान पाटील, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com