शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका : जिल्हाधिकारी

शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका : जिल्हाधिकारी
शेतकऱ्यांना अनावश्‍यक कागदपत्रे मागू नका : जिल्हाधिकारी

अमरावती   : खरीप पीककर्जाचे वाटप करताना शेतकऱ्यांकडे कुठल्याही अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी करू नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी बॅंकांना दिलेले आहेत. बॅंकांकडून कर्जवाटपात टाळाटाळ होत असल्यास शेतकऱ्यांनी तातडीने तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बॅंकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज मंजूर करण्यासाठी अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावून त्यांना निर्देश दिले.

बॅंकांकडून  अनावश्‍यक कागदपत्रांची मागणी झाल्यास किंवा कर्जवाटपात टाळाटाळ होत असल्यास तहसीलदार, सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com