दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी : पालकमंत्री देशमुख

दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी : पालकमंत्री देशमुख
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी : पालकमंत्री देशमुख

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी, चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाने प्रभावी उपाययोजना आखल्या आहेत. त्यामुळे शेतकरी व सामान्य जनतेने दुष्काळामुळे खचून जाऊ नये, अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी रविवारी (ता. १७) दिली. 

देशमुख यांनी मंगळवेढा तालुक्यातील रेड्डे, शिदनकेरी, शिरनंदगी, हजापूर, भाळवणी, निबोणी, जिंन्ती, यड्राव, चिकलगी, खवे, बावची, सलगर, लवंगी, सलगर खुर्द,  हुलजंती, पौट, सौडी, येळगी, माळेवाडी  दुष्काळी गावांतील ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार श्रीकांत पाटील, गट विकास अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, ''गावांनी टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावेत. त्यामध्ये गाव व वाड्यावस्त्यांना लागणारे पाणी, जनावरांसाठी लागणारे पाणी याचा समावेश असावा. मागणी येताच २४ तासांत टँकर उपलब्ध करून दिला जाईल. पाणीपुरवठ्याची सोय नाही, अशा वाड्यावस्त्यांवर प्राधान्याने टँकर सुरू करावेत. या ठिकाणच्या सरपंच व ग्रामसेवकांनी टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करावा.'' 

पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. यासाठी संस्थांनी चारा छावणी सुरू करण्यासाठी अर्ज करावेत. मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी भागातील गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी देण्याबाबत पाठपुरावा  केला जाईल. शासनाने दुष्काळाची मदत जाहीर केली आहे. तिचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, असेही पालकमंत्री देशमुख म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com