दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे

दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे
दुष्काळी उपाययोजनांसाठी कोरड्या धरणात धरणे

बीड : मराठवड्यातील सर्वात तीव्र दुष्काळी परिस्थिती बीड जिल्ह्यात आहे. सरासरीच्या निम्माही पाऊस पडला नाही. पावसाअभावी खरिपाची उत्पादकता घटली असून रब्बीचीही पेरणी नाही. शासनाचे दुष्काळाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. १६) परिसरातील पिंपरगव्हाण येथील कोरड्या तलावात धरणे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात शेतकरी बैलगाड्या आणि जनावरे घेऊन सहभागी झाले. तर, लेकराबाळांसह महिलांनीही रिकामे हंडे घेऊन आंदोलनात भाग घेतला.

दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झालेला असताना शासन व प्रशासन बैठकांचा फार्स करत आहे. मागण्यांच्या निवेदनांची दखल घेतली जात नाही, त्यामुळे असे आंदोलन केल्याचे संयोजक राजेंद्र मस्के म्हणाले. जनावरांना चारा - पाण्याची सोय करावी, शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, शंभर दिवस पुरेल येवढा चारा उपलब्ध असलेला चुकीचा अहवाल रद्द करावा, मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत, आदी विविध मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com