दुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार : विखे पाटील

दुष्काळप्रश्‍नी  सरकारला धारेवर धरणार : विखे पाटील
दुष्काळप्रश्‍नी सरकारला धारेवर धरणार : विखे पाटील

हिंगोली : दुष्काळ जाहीर करण्याच्या जाचक निकषांमुळे अनेक शेतकरी दुष्काळी मदतीपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या प्रश्नांवर विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात सरकारला धारेवर धरणार आहोत, असे विधान सभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

विखे पाटील यांनी बुधवारी (ता. १४) सायंकाळी पिंपळदरी (ता. औंढा नागनाथ) येथील शेतकरी श्रीरंग रिठ्ठे यांच्‍या शेतातील पीक परिस्थितीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून व्यथा जाणून घेतल्या. या वेळी खासदार ॲड. राजीव सातव, आमदार डॉ. संतोष टारफे, काँग्रेसचे जिल्‍हाध्यक्ष संजय बोंढारे, जिल्‍हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते, गयबाराव नाईक, सरपंच अनिता फलटणकर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्‍थित होते.

विखे पाटील म्हणाले, ‘‘राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे शासनाला गांभीर्य राहिलेले नाही. जाचक निकषांमुळे दुष्काळाने होरपळून निघालेले शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. कमी पैसेवारी असतानाही वसमत आणि औंढा नागनाथ तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळले. विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात या प्रश्नावर सरकारला जाब विचारणार आहे.``

शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जाण्याची धमक सरकारमध्ये नसल्‍यामुळेच सत्ताधारी मंत्री शहरी भागातच फिरत असल्‍याचा आरोप विखे पाटील यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com