‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने शिंधखेडातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी

‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने शिंधखेडातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने शिंधखेडातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी

धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत आवर्तन सोडले; परंतु हे पाणी शेवटच्या टोकापर्यंत अपेक्षित गतीने पोचले नसल्याची नाराजी शेतकऱ्यांमध्ये आहे. या पाण्यामुळे काही ठिकाणी जलसंचय राहणार असल्याने मार्च महिन्यात टंचाई कमी होईल, असा विश्‍वास काही शेतकऱ्यांनी व्यक्त केला. 

दुष्काळामुळे पांझरा नदीकाठच्या गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. पशुधनालाही पुरेसे पाणी मिळत नसल्याची स्थिती आहे. अक्कलपाडा प्रकल्पातून पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी होती. या प्रकल्पात १३४० दशलक्ष घनफूट जलसाठा होता. पैकी ६४० दशलक्ष घनफूट जिवंत जलसाठा आहे. नदीपात्रात वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी संबंधित विभागाने घेतली. नदीकाठच्या धुळे, शिंदखेडा व जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्‍यातील सुमारे ८५ गावांच्या पाणी योजना पुन्हा सुरू होण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला. 

नदीवर शेवटचे गाव शिंदखेडा तालुक्‍यात आहे. या गावांपर्यंत अपेक्षित गतीने, अधिक दिवस जलप्रवाह आला नाही, असे शेतकरी, ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शेवटच्या गावापर्यंत पाणी घेऊन जाण्याची जबाबदारी संबंधित तालुका प्रशासन, जिल्हा परिषदेशी संबंधित कर्मचाऱ्यांवर आहे. नदीत पाणी पोचल्याचा आनंद अमळनेर तालुक्‍यातील ११ गावांमधील ग्रामस्थांनी व्यक्त केला. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केलेल्या मागणीमुळे हे पाणी सोडल्याचा दावाही काही ग्रामस्थांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com