टेंभूच्या पाणी व्यवस्थापनामुळे वाद-संघर्ष निकाली

टेंभूच्या पाणी व्यवस्थापनामुळे वाद-संघर्ष निकाली
टेंभूच्या पाणी व्यवस्थापनामुळे वाद-संघर्ष निकाली

आटपाडी, जि. सांगली : टेंभूच्या पाण्याचे योग्य वितरण, चोरीला आळा, वसुली आणि पाणी बचतीचे आदर्श व्यवस्थापन शेटफळे (ता. आटपाडी) येथे रेबाई तलावावर केले आहे. यामुळे वाद-संघर्ष आणि पाणीपट्टीचा प्रश्‍न निकाली निघाला आहे.

टेंभू उपसा योजनेचे पाणी तालुक्‍यात २०१३ दरम्यान तालुक्यातील शेटफळे गावात आले. रेबाई तलाव आणि ओढ्यात पाणी येते. सुरवातीला पाण्याचे नियोजन नव्हते. ५२ द.ल.घ.फूट क्षमतेचा तलाव ८० टक्‍के भरण्यासाठी किमान पंधरा लाख रुपये गोळा करावे लागायचे. 

सुरवातीला बेसुमार उपशामुळे सहाच महिन्यात तलाव मोकळा होत होता. पाणी उपसण्याला मर्यादाच नव्हती. बेसुमार आणि गरज नसतानाही शेतकरी पाणी उपसत होते. कमी-जास्त पाणी उपसण्याच्या प्रकारामुळे पाणीपट्टी गोळा करतानाही त्रास होत होता. कमी-जास्त क्षेत्र आणि पैसे यावरून वादावादी होत होती. यावर मार्ग काढण्यासाठी कोणत्याही संस्थेशिवाय गावातील साऱ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. 

गेल्या वर्षी तलावावरील सर्व विद्युत पंपांना मीटर बसविले. मीटर बसविल्याशिवाय पंपच सुरू करून दिले नाहीत. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. ७० पंपांना शंभर टक्‍के मीटर बसले आहेत. सध्या पाणीपट्टीची आकारणी एका युनिटला १ रुपया ७५ पैसे प्रमाणे केली जात आहे.

विद्युत पंपांना मीटर बसविल्यामुळे पाणीपटी वसुली शंभर टक्‍के बंद झाली आहे. शिवाय शेतकरी पाण्याची बचत करू लागले आहेत. चांगले पाणी व्यवस्थापन झाले असून, शिस्त लागली आहे.  - अरुण गायकवाड, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com