धुक्‍यामुळे उगवणीच्या अवस्थेतील ऊस, ज्वारीवर परिणाम शक्‍य

जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात धुके आहे. राज्याच्या काही भागांत धुके, गारपिटीची शक्‍यता वर्तविली आहे. यामुळे आणखी दोन ते तीन दिवस तरी धुक्‍याचे प्रमाण कायम राहण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीनुसार पिकांवर फवारणी करावी. - डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
धुक्याचा पिकांवर परिणाम
धुक्याचा पिकांवर परिणाम
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने धुके पडत असल्याने याचा परिणाम बहुतांशी करून नवीन लागवड झालेल्या उसाबरोबरच ज्वारीसारख्या रब्बी पिकावरही होणार आहे. धुक्‍याचे प्रमाण वाढल्यास कीड - रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. 
 
शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सकाळपासून धुक्‍याचे साम्राज्य राहिले. दुपारी बारापर्यंत सूर्यप्रकाश नव्हता. सकाळी पाच ते सात वाजेदरम्यान सलग धुके राहिल्याने याचा परिणाम पिकांवरही होण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली.
 
सध्या जिल्ह्यात उस तोडणी व उसाची नवी लागवड वेगात सुरू आहे. धुके वाढल्यास उगवून आलेल्या उसाच्या पाल्यावर तपकिरी ठिपके पडण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर ऊस तुटून गेलेल्या खोडव्याच्या उगवणीचेही नुकसान होण्याची शक्‍यता आहे. खोडक्‍यावर बुरशी तयार होऊन उसाच्या उगवणीत घट येऊ शकते. याचबरोबर रब्बी पिकांमध्ये जी ज्वारी पोटरीच्या अवस्थेत आहे त्या ज्वारीवर धुक्‍यातून निर्माण होणारे बारीक थेंब साचून कणसाच्या दर्जावरही परिणाम होण्याची भीती आहे.
 
जिल्ह्यात गहू व हरभरा ही रब्बीची मुख्य पिके आहेत. परंतु, या पिकांच्या पक्वतेचा कालावधी पूर्ण होत आहे. काही भागात हरभरा काढणीलाही आला असल्याने या पिकांना धुक्‍याची झळ फारशी पोचणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com