पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर परिणाम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. पाऊस नसल्याचा परिणाम ऊस लागवडीवरही झाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लागवडीवरही हा परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात खरिपात आणि दिवाळीच्या काळात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. गेल्या दोन वर्षात चांगल्या पावसाच्या आधारावर लागवड क्षेत्र वाढले असल्याने साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात होते.

उसाचे दरवर्षीच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र एक लाख चार हजार ३६३ हेक्‍टर आहे. मात्र यंदा आतापर्यंत ३३ हजार ४३१ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. मे-जून महिन्यात उसाची चांगली लागवड होत असते. त्यानंतर जसा पाऊस होईल तशी लागवड केली जाते. यंदा मात्र अजूनही पाऊस नाही. त्यामुळे पाणीपातळीतही वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे.

यंदा आतापर्यंत सरासरीच्या तीस टक्केच लागवड झाली आहे. मात्र अजूनही पाऊस नसल्याने यंदा सरासरीएवढी लागवड होण्याचीदेखील शक्‍यता नाही. हुमणीचा साधारणतः तीस टक्‍के क्षेत्रावर प्रादुर्भाव झाल्याने खोडवा ऊसासह नव्याने ऊस लागवड केलेले शेतकरी धास्तावले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com