औरंगाबाद येथे होणार अंडीपुंज निर्मिती केंद्र

राज्यात रेशीम उद्योग विस्तारत आहे. रेशीम उद्योगातील अंडीपुंज निर्मितीचा विषय अंडीपुंज निर्मिती केंद्रामुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळाली असून केंद्र निर्मितीसाठी आवश्‍यक खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तालयाकडून शासनास पाठविण्यात आला आहे. - दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : राज्यात रेशीम उद्योग विस्तारत आहे. या उद्योगासाठी आवश्यक अंडीपुंज निर्मितीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारले जाणार आहे. आजघडीला अंडीपुंजसाठी कर्नाटक राज्यावर अवलंबून राहवे लागते. ही स्थिती संपुष्टात आणण्यासाठी रेशीम विभागाने प्रयत्न चालविले आहेत. अंडीपुंज निर्मिती केंद्राबरोबरच आवश्‍यक असलेले शीतगृहदेखील उभारले जाणार आहे.

जालन्यात प्रायोगिक तत्त्वावरील कोष खरेदी बाजारपेठ, स्वयंचलित रेलींग युनिट, औरंगाबाद जिल्ह्यात चॉकी सेंटर, रोपवाटिकेद्वारे तुती रोपाची निर्मिती यानंतर आता अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारणीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम उद्योगासाठी पूरक ठरणार आहे. राज्याला गतवर्षापर्यंत ४० लाख अंडीपुंजाची गरज होती. त्यापैकी जवळपास १६ लाख अंडीपुंजाची निर्मिती गडहिंग्लज येथील अंडीपुंज निर्मिती केंद्रात होत होती.

यंदा विस्तारलेल्या तुती क्षेत्रामुळे अंडीपुंजाची गरज जवळपास ८० लाखांवर पोचली आहे. गडहिंग्लजच्या अंडीपुंज निर्मिती केंद्राने क्षमतेच्या पुढे जाऊनही कामगिरी केल्यास अंडीपुंज निर्मिती २५ लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता नाही. शिवाय तेवढी अंडीपुजी उपलब्ध झाली तरी राज्याची गरज भागविण्यासाठी किमान ५५ लाख अंडीपुंजाची गरज लागणारच आहे. त्यासाठी कर्नाटकवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. रेशीम उद्योगातील महतत्त्वपूर्ण अंडीपुज निर्मितीसाठी लागणारे कोट्यवधी रुपये वाचविण्यासाठी महाराष्ट्रात अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारण्याची नितांत गरज आहे; तसेच महाराष्ट्रातच अंडीपुज निर्मिती झाल्यास निर्माण झालेल्या अंडीपुंज येथील वातावरणाशी समरस असतील. त्यामुळे रेशीम उत्पादन वाढविण्यासह त्याचा मोठा हातभार लागण्याची आशा आहे.

विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या विशेष पुढाकारातून अंडीपुंज निर्मितीसाठीचा जवळपास ४० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनातच शासनाला पाठविण्यात आला आहे. शिवाय औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चिकलठाणा एमआयडीसीमध्ये गट क्रमांक २१८ मधील जवळपास २५ एकर जागा या केंद्रासाठी दिली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com