कृषिपंपांना भारनियमनाची समस्या

कृषिपंपांना भारनियमनाची समस्या
कृषिपंपांना भारनियमनाची समस्या

जळगाव  ः जिल्ह्यात कृषिपंपांना भारनियमनाचा फटका बसत असून, यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पूर्वहंगामी कापूस लागवडीसह केळीच्या पिकासंबंधी प्रश्‍न निर्माण होत आहेत. जिल्ह्यात केळीसह कापसासाठी ठिबकचा वापर शेतकरी करतात. परंतु विजेचा प्रश्‍न मागील सात ते आठ दिवसांपासून भेडसावत आहे. दिवसा सात तास तर रात्री आठ तास वीज मिळते. त्यात दिवसा वीजपुरवठा सुरू असतो त्या वेळेस वीज मध्येच बंद केली जाते. बुधवारी (ता. २३) जळगाव, यावल व चोपडा भागांत अनेक कृषिपंपांचे फीडर बंद होते. सकाळी १० वाजता वीजपुरवठा अपेक्षित होता. परंतु दुपारी तीनपर्यंत वीज आलीच नाही. सध्या कापसासाठी ठिबक तपासून घेण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी कृषिपंप सुरू असणे आवश्‍यक असते. अन्यथा ठिबक सिंचनासाठी योग्य आहे का, कुठले ड्रीप बंद आहेत हे समजत नाही. ठिबक अंथरली तरी ती सिंचनक्षम आहे की नाही हे तपासालायला रात्रीच्या वेळेसही शेतकऱ्यांना शेतात टॉर्च घेऊन शेतात काम करावे लागत आहे. यामुळे कापूस लागवड अनेक शेतकऱ्यांना विलंबाने करावी लागेल, अशी स्थिती आहे. वीज कंपनी या प्रश्‍नाकडे लक्ष देत नसल्याने अडचणी वाढत आहेत. मध्यंतरीदेखील हा प्रश्‍न होता. त्यासंदर्भात स्थानिक कार्यालये दखल घेत नाहीत. असा प्रकार सुरू राहिला तर केळी व कापूस पिकाला फटका बसेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com