जळगावची केळी काश्मिरात दाखल

केळीची पाकिस्तान किंवा आखाती राष्ट्रांमधील निर्यात सुरू व्हावी, चालना मिळावी यासाठी कृषी, विदेश व वाणिज्य मंत्रालयाने धोरणात्मक निर्णय घ्यायला हवा. त्याचा लाभ देशभरातील केळी उत्पादकांना होईल. - नरेंद्र पाटील, केळी उत्पादक, विटनेर, ता. चोपडा, जि. जळगाव
जळगावची केळी काश्मिरात दाखल
जळगावची केळी काश्मिरात दाखल

जळगाव ः जिल्ह्यातील केळी देशातील संवेदनशील राज्य म्हणून परिचित असलेल्या जम्मू व काश्‍मीरमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यातून रोज जवळपास तीन हजार क्विंटल केळी मोठे कंटेनर, ट्रकद्वारे तेथे पोचत अाहे. त्यामुळे दर्जेदार केळी उत्पादकांना अधिक उत्पन्न मिळत आहे. परंतु पाकिस्तानमधील केळी निर्यात मात्र ठप्पच आहे. त्यामुळे दररोजचा सात ते आठ लाखांचा फटका केळी उत्पादकांना बसत आहे.  जम्मू व काश्‍मीरमध्ये मध्यंतरी पावसाळ्यानंतर निर्माण झालेली समस्या व तेथे दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी सुरू असलेले ऑपरेशन ऑलआउट यामुळे केळीची मागणी फारशी नव्हती. व्यापारीही केळी मागविण्याचे धाडस करीत नव्हते. केळी जायची, पण ती जम्मूपर्यंतच पोचू शकत होती. तेथून काही प्रमाणात श्रीनगगरपर्यंत केळी लहान वाहनांनी जायची. परंतु अलीकडे वाढलेली थंडी आणि पर्यटनाचे दिवस लक्षात घेता काश्‍मीरमधून केळीची मागणी वाढली असून, सावदा (ता. रावेर, जि. जळगाव), वाघोदा बुद्रुक (ता. रावेर) व रावेरातून काश्‍मीर येथे बॉक्‍समध्ये केळी पाठविली जात आहेत.  २०० रुपये दर अधिक  तेथे निर्यातीसाठी टिश्‍यू रोपांच्या बागेतील दर्जेदार केळी व्यापारी खरेदी करीत असून, मोठे कंटेनर, ट्रकमध्ये तेथे केळी पाठविली जात आहे. केळीच्या घडातून दांडा वेगळा करून बॉक्‍समध्ये फण्या भरल्या जातात. केळी उत्पादकांना प्रचलित दरांपेक्षा २०० रुपये क्विंटलमागे अधिक मिळत असल्याची माहिती मिळाली. 

पाकिस्तानमधील निर्यात ठप्प सावदा (जि. जळगाव) येथील अनेक केळी व्यापारी श्रीनगर (काश्‍मीर) येथील व्यापाऱ्यांच्या माध्यमातून पाकिस्तानला पाठवीत होते. तेथे रोज सुमारे अडीच ते तीन हजार क्विंटल केळी पाठविली जात होती. परंतु पाकिस्तानमधील केळी निर्यात मागील चार- पाच महिन्यांपासून ठप्प आहे. केळीच्या बदल्यात  पाकिस्तानमधून बदाम, काजू यायचे. ते श्रीनगरमधील व्यापारी स्वीकारायचे. त्या बदल्यात श्रीनगरमधील व्यापारी किंवा मध्यस्थ सावदा येथील व्यापाऱ्यांना पैसे द्यायचे. पाकिस्तानमधील केळी निर्यातीमुळे केळी उत्पादकांनाही क्विंटलमागे २५० रुपये अधिक मिळायचे. पण तेथील निर्यात ठप्प असल्याने रोजचा जवळपास सात लाख रुपये फटका केळी उत्पादकांना बसत आहे.  प्रतिक्रिया केळीची पाकिस्तानमधील निर्यात ठप्पच आहे. पाच महिने झाले, तेथे केळी जात नाही. मध्यंतरी काश्‍मीरमधून कमी मागणी होती. परंतु सध्या काश्‍मीरमध्ये श्रीनगर व इतर भागांत रोज सावदा, रावेरातून केळी जात असून, ती यंदा बॉक्‍समध्ये प्रथमच अनेक जण पाठवीत आहेत. तेथे दर्जेदार केळीला मागणी वाढली आहे.  - सुनील पाटील, केळी व्यापारी, सावदा, ता. रावेर, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com