कृषिपंप वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांचा मोर्चा

वसमत, जि. हिंगोली ः कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (ता. २८) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला . (छायाचित्र ः नागेश चव्हाण, वसमत)
वसमत, जि. हिंगोली ः कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासह अन्य मागण्यासाठी शनिवारी (ता. २८) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला . (छायाचित्र ः नागेश चव्हाण, वसमत)

वसमत, जि. हिंगोली ः कृषिपंपांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. २८) उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. अल्प पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद आदी पिके वाया गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यात कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्यामुळे उपलब्ध पाणी कापूस, हळद, ऊस आदी पिकांना देता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कृषिपंपाचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यात यावा. रात्री ऐवजी दिवसा वीजपुरवठा सुरू ठेवावा. गावठाण फीडर दुरुस्त करण्यात यावे. कृषिपंपासाठी रोहित्र बसविण्यात यावे आदी मागण्यांसाठी तसेच वीज वितरण कंपनीच्या मनमानी धोरणांविरुद्ध राजू पाटील नवघरे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी वसमत येथील उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता.

या वेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. या मोर्चामध्ये गोरख पाटील, तानाजी बेंडे, जिजाराव हरने, देवानद व्यवहारे, विजय सवंडकर, विश्वनाथ फेगडे, त्र्यंबक कदम, नागेश नवघरे, विनायक माखणे, भिसे, गौतम दवने आदसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com