शेतकरीप्रश्नी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा

परभणी ः शेतकरीप्रश्नी शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. (छायाचित्र ः योगेश गौतम)
परभणी ः शेतकरीप्रश्नी शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. (छायाचित्र ः योगेश गौतम)

परभणी : शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

खरीप हंगामातील पिके वाया गेली आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. शासनाने घोषित केलेली कर्जमाफी फसवी असून, शेतकऱ्यांनी सरकसट कर्जमाफी देण्यात यावी. कापूस, सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी.

दिवसभर भारनियमन करू नये. थकबाकीमुळे कृषिपंपांच्या जोडण्या तोडू नयेत आदी मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे शनिवार बाजार मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

या वेळी आयोजित सभेस शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, आमदार डाॅ. राहुल पाटील, डाॅ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सदाशिव देशमुख, नंदू आवचार, प्रभुलाल जयस्वाल आदी उपस्थित होते.

या वेळी श्री. वडले म्हणाले, की नोटाबंदीमुळे देशात आर्थिक आणीबाणी निर्माण झाली. शेतकरी, गरिबांचे हाल झाले. अनेक अटींमुळे कर्जमाफी जाचक ठरली आहे. शेतकऱ्यांना भीक नको आहे, हक्काच्या घामाचे पैसे द्यावेत. शेतकरी आत्महत्येची खिल्ली उडवली जात आहे.

हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई यापुढेही सुरूच ठेवली जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले. मोर्चादरम्यान बैलगाड्यांमध्ये बोंड अळीग्रस्त कापसाची झाडे घेऊन शेतकरी मोठ्या संख्येन सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com