शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीत : केंद्रीय कृषिमंत्री

शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीत : केंद्रीय कृषिमंत्री
शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाहीत : केंद्रीय कृषिमंत्री

नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत अद्यापही केंद्राने ठरवून दिलेल्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) शेतकऱ्यांना मिळत नाहीत. हे वास्तव असून शेतीमालास रास्त दर मिळावेत, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतेच राज्यसभेत सांगितले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे करणार, याविषयी काय योजना आहेत असे प्रश्न काही सदस्यांनी विचारले होते. राज्यसभेत शून्य प्रहरात चर्चेवेळी या प्रश्नांना उत्तर देताना कृषिमंत्री सिंह म्हणाले, की माझा स्वत: चा अनुभव आहे की दिल्ली ते कोलकता या दोन शहरांतील परिसरात आणि येथून आसपासच्या १०० किलोमीटरच्या परिघात सरकारने भातासाठी जाहीर केलेली ‘एमएसपी’ शेतकऱ्यांना बहुतेक वेळा मिळत नाही. गहू आणि भाताशिवाय अन्य काही शेतीमालांनाही हमीभाव जाहीर करण्यात येतो. शिवाय किमत साह्य योजनासुद्धा (प्राईस सपोर्ट स्कीम) आहे. या योजनेंतर्गत हमीभावापेक्षा दर कमी झाल्यास सरकारद्वारे खरेदी करण्यात येते. राज्याकडून याविषयी प्रस्ताव आल्यास केंद्र अर्थपुरवठाही करते.

माझा स्वत:चा असा अनुभव आहे, की सरकारने जाहीर केलेली ‘एमएसपी’ शेतकऱ्यांना अभावानेच मिळते. शेतीमालाच्या दरासंदर्भात योग्य पद्धती कोणती असावी, याविषयी निती आयोग आणि राज्यांसोबत चर्चा सुरू आहे. -राधामोहन सिंह , केंद्रीय कृषीमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com