नगरमध्ये कापूस लागवड करताना धाकधूक कायम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः जिल्ह्यात पाच ते सहा दिवसांपासून पावसाने सुरवात केली खरी; पण दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने कापूस लागवड, खरिपाच्या पेरणीबाबत शेतकऱ्यांत धाकधूक कायम आहे. पावसाने पुन्हा दडी मारली तर दुबार पेरणीचे तर संकट येणार नाही ना याची धास्ती कायम आहे. दरम्यान, चांगला पाऊस झालेल्या बहुतांश भागात पेरणी, कापूस लागवडीला सुरवात झाली आहे.

पावसाळा सुरू झाला तरी गेली पंधरा दिवस पाऊस नव्हता. अनेक भागांत पूर्वमोसमी पाऊस झाला नाही. शिवाय चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणी, कापूस लागवडीची आजीबात घाई करू नये, असे कृषी विभागाने आवाहन केले होते. शिवाय कापसाची उन्हाळी लागवड होणार नाही, याचीही कृषी विभागाने काळजी घेतली. परिणामी यंदा कापसाची आधी लागवड झाली नाही. पावसाळा सुरू झाल्यावरही १५ दिवस पाऊस झाला नाही. त्यामुळे अगदी रविवारपर्यंत (ता.२४) जिल्हाभरात पेरणी, कापूस लागवडीला वेग आलेला नाही.

पाच ते सहा दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाला. मात्र, रविवारपासून पावसाने पुन्हा उघडीत दिली. सोमवारी दिवसभरही पाऊस झाला नाही. मागील आठवडाभरात झालेल्या पावसामुळे कापूस लागवडीला सुरवात जाली. वाफसा असलेल्या भागात पेरण्याही करण्याची लगबग सुरू झाली. बियाणे-खते खरेदीसाठी बाजारात शेतकऱ्यांची गर्दी आहे. मात्र, दोन दिवसांच्या उघडिपीने लागवड, पेरणी करताना मनात धाकधूक कायम आहे.

गेल्या वर्षी व त्याआधीही अनेक वेळा सुरवातीच्या पावसावर कापूस लागवड व पेरणी केल्यानंतर पाऊस गायब झाल्याने अनेकांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली होती. त्यामुळे दोन दिवसांची उघडीप शेतकऱ्यांच्या मनात शंका उपस्थित करत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com