पुणे : राज्यात उत्पादित हाेणाऱ्या नाशवंत आणि अतिनाशवंत शेतीमालाला परराज्यांतील व्यापारास चालना देण्यासाठी पणन मंडळाने विमान वाहतूक दरामध्ये ५० टक्के अनुदान याेजना जाहीर केली आहे. याेजना पुढील सहा महिन्यांसाठी फक्त जम्मू काश्मीर आणि ईशान्य पूर्वेकडील विविध राज्यांसाठी असणार असून, महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे शेतीमाल देशांतर्गत बाजारपेठेत पाठविण्यात येणार आहे. तर संंबंधित राज्यांतून शेतीमाल आणण्यासाठीदेखील ५० टक्के अनुदान असणार असून, यासाठी ५० लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी माहिती दिली. श्री. पवार म्हणाले, ‘‘राज्यातील फळे भाजीपाल्यांना दुर्गम राज्यांमध्ये बाजारपेठ उपलब्ध हाेण्यासाठी विमान वाहतूक अनुदान याेजना राबविण्याबाबत विचार सुरू हाेता. नाशवंत शेतीमालाला अधिकाधिक बाजारपेठ उपलब्ध हाेऊन अधिकचे दर मिळण्यासाठी विविध प्रयत्न, उपक्रम, याेजना पणन मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. महाराष्ट्रातून विविध शेतीमाल विविध राज्यांमध्ये पाठविला जाताे. मात्र जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील विविध राज्यांचे रस्ते आणि रेल्वेद्वारे अंतर महाराष्ट्रापासून जास्त असल्याने या राज्यांमध्ये शेतीमाल जाण्याचे प्रमाण कमी आहे. तसेच अंतर लांब असल्याने वाहतुकीमध्ये शेतीमाल खराब हाेण्याचे प्रमाण अधिक आहे. वाहतुकीचा कालावधी कमी करत, कमीत कमी वेळेत दर्जेदार माल बाजारपेठेत पाठविण्यासाठी थेट विमानाने शेतीमाल पाठविण्यासाठी प्राेत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.’’ विमान वाहतुकीचा खर्च कमी करण्यासाठी पणन मंडळाद्वारे ही प्राेत्साहनपर याेजना लागू केली आहे. या याेजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी पणन मंडळाकडे नाेंदणी करणे आवश्यक असून, मंडळाची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. तसेच शेतीमालाची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचा तपशीलदेखील देणे बंधनकारक असणार आहे. असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे. अशी आहे याेजना
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.