शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या पूरक व्यवसायाकडे वळावे : गहलोत

शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या  पूरक व्यवसायाकडे वळावे : गहलोत
शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायासारख्या पूरक व्यवसायाकडे वळावे : गहलोत

वर्धा : जिल्ह्यात लहान, मोठे मिळून १८० तलाव आहेत. या तलावांमध्ये ९ ते १० महिने पाणी साठून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एका हंगामात तरी मत्स्य व्यवसायाचा पर्याय निवडावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गहलोत यांनी केले.

विकास भवन येथे आयोजित तलाव तेथे मासोळी अभियानअंतर्गत मत्स्य संवर्धन व शेतीधारक शेतकरी कार्यशाळेत ते बोलत होते. कृषी विभागाचे उपसंचालक कापसे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे सदस्य प्रशांत इंगळे, मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष कमलेश मारबते, दुर्गेश केंडे, नागपूरचे सहायक मत्स्य व्यवसाय अधिकारी ऋत्‍विक वाघमोडे, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्‍त शा. डोंमळे उपस्थित होते.

पारंपरिक तंत्रज्ञानाचा वापर करून मत्स्य शेती केल्यास कमी खर्चात जास्त उत्पन्न घेता येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिकस्राेत बळकट होण्यास मदत होईल. जिल्ह्यातील उपलब्ध जलक्षेत्रात योग्य प्रमाणात व योग्य आकारमानाची मत्स्य बोटूकली संचयन करून शास्त्रोक्‍त पद्धतीने मत्स्य संवर्धन केल्यास जिल्ह्याच्या मत्स्योत्पादनात भर पडेल, असेही गहलोत म्हणाले. तलाव तेथे मासोळी अभियानाअंतर्गत १०० टक्‍के अनुदानावर मत्स्य बीज उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com