शेतमाल तारण योजनेतून २३ कोटींचे वाटप

शेतमाल तारण योजनेतून २३ कोटींचे वाटप
शेतमाल तारण योजनेतून २३ कोटींचे वाटप

सोलापूर : राज्यात शेतमाल तारण योजनेमध्ये ३०७ बाजार समित्यांपैकी केवळ १२१ बाजार समित्यांनी सहभाग घेतला. या बाजार समित्यांच्या माध्यमातून तीन हजार १४४ शेतकऱ्यांचा एक लाख २१ हजार ४०३ क्विंटल माल तारण ठेवला आहे. त्याबदल्यात शेतकऱ्यांना २२ कोटी ९५ लाख रुपयांचे वाटप केले असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.  राज्यात पुढील वर्षापासून गावातील विकास सोसायट्यांमार्फत पणन महामंडळ शेतमाल तारण योजना राबविण्यावर भर देणार आहे. त्यासाठी ज्या सोसायट्यांना गोडाऊनची गरज आहे, त्या सोसायट्यांनी गोडाऊन बांधण्यासाठी पणन महामंडळाकडे अर्ज करण्याचे आवाहनही सहकार व पणनमंत्री देशमुख यांनी केले आहे. त्यासाठी पणन महामंडळ सोसायट्यांना मदत करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.  नेरपिंगळा (जि. अमरावती) या गावातील विकास सोसायटीने २० हजार क्विंटल शेतमाल तारण ठेवला आहे, जे बाजार समित्यांना शक्‍य झाले नाही, ते एका गावातील विकास सोसायटीने शक्‍य करून दाखविले आहे. गावातील विकास सोसायट्यांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही शेतमाल तारण कर्ज योजना सुरू करण्यास परवानगी दिली जाणार आहे. पणन विभागाने २५ डिसेंबर २०१६ पासून अटल पणन महाअभियान सुरू केले. त्यातून ८१६ विकास सोसायट्यांनी स्वतःचे उद्योग सुरू केले, असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. राज्यात ज्या शेतकऱ्यांकडे दीड लाखापेक्षा जास्त कर्ज आहे, त्या शेतकऱ्यांबाबत बॅंकांनी तडजोडीचे धोरण स्वीकारणे गरजेचे आहे. दीड लाखाच्या वरील रकमेवर काही प्रमाणात सूट देऊन शेतकऱ्यांना सात-बारा कोरा करण्यासाठी व त्यांचे बॅंकेतील खाते कर्जमुक्त करण्यासाठी बॅंकांनी तडजोडीची भूमिका स्वीकारावी.  - सुभाष देशमुख, सहकारमंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com