समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ

समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ
समृद्धी महामार्गाला जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची रीघ

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी थेट खरेदीने जागा देऊन पाचपट मोबदला मिळविण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असल्यामुळे इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी हेवेदावे बाजूला ठेवून जमिनीची संमती देण्यासाठी तहसील, प्रांत कार्यालयात रीघ लावली आहे. शासनाने यापूर्वीच सक्तीने भूसंपादन करण्याची अधिसूचना जारी केली असून, त्याची अंमलबजावणी १ सप्टेंबरपासून करण्यात येणार आहे. इगतपुरी तालुक्यात शासकीय व खासगी मिळून जवळपास ८५ टक्के जमिनीचा ताबा शासनाला मिळाला आहे.

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी तालुक्यातील सुमारे ४९ गावांमध्ये जमिनीची खरेदी करण्यात  येत असून, त्यासाठी शासनाने बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊ केला आहे. परंतु सुरवातीला शेतकऱ्यांनी या महामार्गाला व जमीन देण्यास विरोध केल्याने काहीशा उशिराने जमिनी ताब्यात घेण्यास सुरवात झाली होती. परंतु अशा परिस्थितीत चारपटच मोबदला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान करून घेण्यापेक्षा संमतीने जागा देण्याची तयारी दर्शविली आहे.

जमीन देण्यासाठी शेतकऱ्यांची समंती मिळत असल्याने आणखी दोन टक्क्याने संपादन वाढण्यास मदत होणार आहे. आजपर्यंत जिल्ह्णातील सहा हजार शेतकऱ्यांकडून समृद्धीसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. साधारणत: ८० टक्के जमीन ताब्यात आल्यानंतर उर्वरित जमिनीचे सक्तीने भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. संमतीने न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने घेतली जाईल, त्यासाठी निवाडे जाहीर केले जाणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com