शेतकऱ्यांना शेतमालाचा भाव ठरविण्याचा अधिकार : सुभाष देशमुख

सोलापुरात आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचे उद्‌घाटन महापौर सौ. शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले. या वेळी सकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.
सोलापुरात आयोजित शेतकरी आठवडे बाजाराचे उद्‌घाटन महापौर सौ. शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते झाले. या वेळी सकारमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार आदी उपस्थित होते.

सोलापूर  : "राज्य शासन शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून अनेक धोरणात्मक निर्णय घेत असून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी कटिबद्ध आहे, संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान सुरू करून शेतकरी ते थेट ग्राहक अशी भाजीपाला विक्रीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. शिवाय ग्राहकांनाही ताजा, स्वच्छ, योग्य वजनाचा शेतमाल वाजवी दरात उपलब्ध होत आहे,'''' असे प्रतिपादन सहकार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केले.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळातर्फे संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडे बाजार अभियान राबविण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत सोलापूर शहरातील पाचव्या शेतकरी आठवडे बाजारचे उद्‌घाटन कर्णिक नगर क्रीडांगण येथे राज्याचे सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

उदघाटन प्रसंगी सोलापूरच्या महापौर शोभा बनशेट्टी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त अविनाश ढाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सोलापूर शहरामधील नागरिकांचा आठवडे बाजारास मिळालेला प्रतिसाद पाहून शहरात किमान १० शेतकरी आठवडे बाजार सुरू करण्याचा कृषी पणन मंडळाचा प्रयत्न आहे. नागरिकांनी शेतकरी आठवडे बाजाराचा लाभ घ्यावा व शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा.

तसेच सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, ब शेतकरी उत्पादक कंपनी यांनी आपली फळे ब भाजीपाला थेट ग्राहकांना विक्रीसाठी सहभागी व्हावे, असे आवाहन सहकार मंत्री देशमुख यांनी या वेळी बोलताना केले.

या प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, आत्मा प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, मनपा परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर, अविनाश बोमड्याळ, श्रीनिवास रिकमल्ले, सुनील कामाठी, संतोष भोसले, सुभाष शेजवाल, नगरसेविका राधिका पोसा, प्रतिभा मुदगुल, रामेश्वरी बिरू, माजी उपमहापौर प्रवीण डोंगरे आदी मान्यवर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

शेतकरी आठवडे बाजार आजतागायत राज्यात १३० शेतकरी आठवडे बाजार सुरू असून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, नाशिक याप्रमाणे बाजार विविध शहरांमध्ये सुरू आहेत. या बाजारांमधून प्रत्येक आठवड्यात १५०० मेट्रिकटन फळे आणि भाजीपाल्यांची विक्री होत असून प्रत्येक आठवड्यंची उलाढाल सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांपर्यंत जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com