खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या

खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या
खरीप नुकसानीच्या मदतीसाठी शेतकऱ्यांच्या याद्या मागवल्या

सोलापूर : गतवर्षीच्या २०१८ च्या खरीप हंगामात दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीच्या मदतीसाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना शेतकऱ्याचे नाव, बँक खाते क्रमांक, नुकसानीचे क्षेत्र व त्याची होणारी रक्कम, यासह संपूर्ण माहिती येत्या १० दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले.

हा जिल्हा रब्बी हंगामाचा आहे. पण खरिपातही पिके घेतली जातात. अलीकडच्या काही वर्षांत खरीप क्षेत्रातही वाढ होत आहे. त्यामुळे त्याचा फायदा होईल. पण मुळात रब्बीची मदत मिळणे अपेक्षित असताना आता खरिपाच्या मदतीची घोषणा सरकारने केली आहे.

यंदा जिल्ह्यात केवळ ३८ टक्केच पाऊस झाल्याने खरिपासह रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले. त्याची मदत मिळावी, म्हणून गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने मागणी होत आहे. पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्नही गंभीर आहे. टँकर, चारा छावण्यांची मागणी होत आहे. पण अद्याप काहीच हालचाली नाहीत. त्या पार्श्वभूमीवर ही घोषणा कितपत अंमलात येईल, याबाबत साशंकता आहे. तरीही शेतकरी आशा ठेवून आहेत. 

कोरडवाहू पिकांना ६ हजार ८००, बागायती पिकांना १३ हजार ५००, तर बहुवार्षिक पिकांना १८ हजार रुपये हेक्टरी मदत केली जाणार आहे. त्यासाठी २ हेक्टरपर्यंतची मर्यादा ठेवण्यात आली  आहे. तहसीलदारांनीही आता  शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या १ फेब्रुवारीपर्यंत यासंबंधीचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर मदत बँक खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com