प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात ः जलतज्ज्ञ डॉ. राणा

प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात ः जलतज्ज्ञ डॉ. राणा
प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात ः जलतज्ज्ञ डॉ. राणा

पलूस, जि. सांगली ः केंद्र आणि राज्य सरकारकडून शेतकऱ्यांची गळचेपी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालास योग्य भाव नाही. पाण्याचे नियोजन नाही. तरुणांच्या हाताला काम नसल्याने प्रगतिशील महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापले आहेत, असे परखड मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी पलूस येथे व्यक्त केले.

येथील क्रांती साखर कारखान्याने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती बी. एन. देखमुख होते. या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अरुण लाड, शरद लाड, आमदार आनंदराव पाटील, सुभाष आर्वे मारुती चव्हाण उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, ‘महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांपैकी ३२ जिल्ह्यांत दुष्काळ आहे. सरकारकडून १५२ तालुक्‍यांत दुष्काळ जाहीर केला आहे. दुष्काळ जाहीर करून तात्पुरती मदत करणे याचा शेतकऱ्यांना काहीच उपयोग होणार नाही. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय योजना करताना सरकार दिसत नाही. दुष्काळ निधी मिळणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने दुर्भाग्य आहे. सध्याचे सरकार पाणी वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे उपाय योजना करत नाही. यापुढे पाण्याचे संकट असेच वाढत गेले तर पुढील काळ अतिशय वाईट येणार आहे. देशात एकीकडे उत्पादन कमी तर दुसरीकडे पाण्याची कमतरता यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. पाण्याचे संकट दूर करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे काम करण्याची करज आहे.’

माजी न्यायमूर्ती बी. एन. देशमुख म्हणाले, ‘देश स्वातंत्र्य झाल्यानंतरसुद्धा आरक्षणासाठी तरुण आणि कर्जासाठी शेतकरी आत्महत्या करत आहेत. या आत्महत्या शेतकऱ्यांच्या नसून ती बिघडलेल्या अर्थव्यवस्थेची आहे.’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com