शेतकरी मतदारांसाठी बाजार समित्यांचे प्रयत्न

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे : बाजार समिती निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार देण्यात आल्याने आगामी निवडणुकांसाठीची तयारी बाजार समिती सभापती आणि संचालकांनी सुरू केली आहे. तयारीचा भाग म्हणून शेतकरी मतदार कसे करता येतील याकडे विद्यमान संचालकांनी लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त शेतमाल बाजार समित्यांमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

नीरा बाजार समितीने सासवडचा किरकाेळ फळबाजार बंद करून उपबाजार आवारात सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. लवकरच या ठिकाणी फळांचा घाऊक बाजारदेखील सुरू हाेणार आहे. यामुळे बाजारात फळे घेऊन येणारे शेतकरी आपाेआप मतदार हाेणार असून, फळांच्या आवकेमुळे बाजार समितीच्या उत्पन्नातदेखील वाढ हाेणार आहे.

तसेच मागणीनुसार आता शेतकऱ्यांचा शेतमाल व विशेषतः फळे खरेदी-विक्री ही सासवड उपबाजार आणि नीरा बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात होईल. याचा फायदा बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळण्यास हाेईल, असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय गाडेकर यांनी सांगितले.

बाजार समितीच्या या निर्णयाचे शेतकरी संघटनेने स्वागत केले अाहे. संघटनेचे तालुका पदाधिकारी दिलीप गिरमे यांनी उपबाजारात फळ भाजीपाल्याची खरेदी विक्रीसाठी सुविधा देण्याची मागणी केली. यानंतर बाजार समितीने ९ ऑक्‍टोबर राेजी सासवडचा घाऊक फळबाजार बाजार समितीमध्ये सुरू होईल, असे जाहीर केले.

सासवडला नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपआवारात सध्या धान्य खरेदी होते, तर नीरा बाजार आवारात गूळ खरेदी होते. मात्र ताजा शेतमाल खरेदीची व्यवस्था कुठेच नाही. त्यामुळे सासवडला ताजा शेतमाल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील पहिली खरेदी ही फळांची घाऊक बाजारात होईल.

यात सहभागी व्यापाऱ्यांना परवाना देण्याचा प्रयत्न राहील. तर मार्केट यार्डातील शेतकरी सुविधा वाढविण्यात येणार आहे. तसेच भविष्यात दिवे (ता. पुरंदर) येथे सर्व साेयींयुक्त उपआवार सुरू करण्यात येईल, असेही सभापती गाडेकर यांनी सांगितले.

बारामती बाजार समितीचे सभापती रमेश गाेफणे म्हणाले, ‘‘शेतकरी मतदार व्हावेत यासाठी बाजार समिती काही प्रयत्न करत नाहीत. मात्र शेतकरी याबाबत जागरूक झाला असून, आपल्या कुटुंबीयांना मतदानाचा अधिकार मिळावा, यासाठी स्वतःच्या नावाबराेबरत कुटुंबीयांच्या नावाने शेतमाल पाठवीत अाहेत. मात्र करार शेती, वाट्याने शेती करत असणाऱ्या शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार याबाबत साशंकता अाहे.’’

हिशेबपट्टीचे प्रमाण वाढले ः काळे जिल्ह्यातील तालुका बाजार समित्यांमध्ये सर्वांत माेठ्या असणाऱ्या जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे म्हणाले, ‘‘शेतकरी जागरूक झाला आहे. त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार असल्याने शेतकरी कुटुंबीयांच्या नावावर शेतमाल विक्रीसाठी पाठविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हिशेबपट्टी शेतकरी कुंटुंबीयांच्या नावावर हाेत असल्याचा बदल माेठ्या प्रमाणावर जाणवत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com