तिसऱ्या टप्प्यातील ६१ कोटींची अमरावतीतील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः बॅंकांकडून कर्जास टाळाटाळ झाली असतानाच आता बोंड अळीच्या भरपाईपोटी तिसऱ्या टप्प्यातील ६१ कोटी रुपयांची मदतही रोखण्यात आल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. अमरावतीला ६१ कोटी देण्यात आले नाही मात्र यवतमाळला ११६ कोटी तर चंद्रपूरला  ५९ कोटी रुपयांचा निधी याचवेळी मिळाल्याने या दुजाभावाबात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कर्जमाफीच्या धोरणात सातत्याने बदल करीत शासनाने शेतकऱ्यांचा नुसता छळवाद लावला होता. कर्जमाफीच्या निकषात दरदिवशी बदल करीत सुधारित शासकीय परिपत्रक काढले जात असल्याने बॅंकादेखील संभ्रमात होत्या. त्यामुळे कर्जमाफीचा पुरता फज्जा उडाल्याने अनेक बॅंकांनी पात्र शेतकऱ्यांना देखील कर्जास नकार दिला. त्यामुळे खरिपाची सोय करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. त्याच अडचणीत आता बोंड अळीच्या तिसऱ्या टप्प्यातील भरपाई रोखल्याने नव्याने भर पडली आहे.

तिसऱ्या टप्प्यात मदतीपोटी ६१ लाख रुपयांची मागणी अमरावती जिल्ह्याची आहे. परंतु ती न देता यवतमाळ जिल्ह्याकरिता ११६ कोटी तर अर्थमंत्र्यांच्या जिल्हा असलेल्या चंद्रपूरकरिता ५९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यास यापूर्वी ११८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले होते, हे विशेष. अमरावती जिल्ह्यातील ६१ कोटी रुपयांच्या निधीचे वितरण २ लाख शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com