गारपिटीमुळे पिकांच्या नुकसानीपोटी जिल्ह्याला तीन कोटी रुपयांची मदत मिळणे गरजेचे होते; परंतु अद्याप ९६ लाख रुपये भरपाईपोटी जाहीर झाले आहेत. ही रक्कम जिल्हा प्रशासनाकडे येईल आणि त्यानंतर तिचे वितरण होईल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांची माहिती जमा करून एकत्रितपणे रक्कम संबंधित बॅंकेत दिली जाईल. बॅंक ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करील. या प्रक्रियेत आणखी दीड महिना कालावधी जाईल, अशी माहिती मिळाली.
जिल्ह्यात गारपिटीत केळी पिकाचे सुमारे १५०, गव्हाचे सुमारे ९००, मक्याचे जवळपास ८५० हेक्टरवर नुकसान झाले. नुकसान एवढे झाल्याचा अंदाज होता; परंतु भरपाई मात्र तोकडी आल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे अजय बसेर यांनी दिली आहे.
जळगाव तालुक्यात १२० हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज होता; परंतु प्रत्यक्ष पंचनामे करताना केळी व इतर पिकांचे कुठेही ५० टक्क्यांवर नुकसान आढळले नाही. त्यामुळे जळगाव तालुक्यातील सुरवातीला नुकसानीत गृहीत धरलेले क्षेत्र वगळले आहे. त्यामुळे जळगाव तालुक्यातील काही भागाचा अपवाद वगळला तर कुणालाही मदत मिळणार नसल्याची माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.