ॲग्रोवनच्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल : कडवंची’ विशेषांकांचे स्वागत

कडवंची : ‘ॲग्रोवन’च्या अंकाचे स्वागत करताना येथील शेतकरी व केव्हीके तज्ज्ञ.
कडवंची : ‘ॲग्रोवन’च्या अंकाचे स्वागत करताना येथील शेतकरी व केव्हीके तज्ज्ञ.

जालना : कष्ट उपसणारी पहिली पिढी, पीक बदलातून आर्थिक उन्नतीचा मार्ग निवडलेली दुसरी पिढी अन् या सर्वाला तंत्र कल्पकतेसह श्रम सातत्याची जोड देणारी तिसरी पिढी, अशा जालना जिल्ह्यातील कडवंचीमधील तीनही पिढ्यांच्या प्रतिनिधींनी ‘ॲग्रोवन’ने रविवारी (ता. २१) प्रकाशित केलेल्या ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल : कडवंची’ या विशेषांकाचे उत्साहाने स्वागत केले. ॲग्रोवनच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त जल व्यवस्थापनावर आधारित तीन विशेषांकांचे नियोजन करण्यात आले होते. यातील दुसरा ‘मराठवाड्यातलं इस्त्राईल : कडवंची’ हा केवळ कडवंची गावाच्या यशोगाथेवर होतेे. पाणलोट विकास, पीक बदल, पूरक उद्योगात मनापासून सहभाग आणि प्रतिकूल परिस्थिती बदलण्याची कडवंची गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी आजवरच्या वाटचालीचा आढावा ॲग्रोवनने रविवारी या विशेषांकातून घेतला.  कृषी विज्ञान केंद्र जालना, विजयअण्णा बोराडे यांनी दाखविलेल्या मार्गावर आम्ही काम करीत गेलो. संधी मिळत गेल्या त्याला श्रमाची जोड दिल्याने त्याचं सोनं होत गेलं. आज ॲग्रोवन या कृषी दैनिकाने गावाची दखल अंकारूपात घेतल्याने समाधान लाभल्याचे गावकरी म्हणाले. अर्थात, त्यामुळे जबाबदारीत वाढ झाली असून, हे सातत्य कायम ठेवण्याचा विश्वासही ग्रामस्थांनी व्यक्त केला. कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्या शेतात आयोजित या अंक स्वागत कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख एस. व्ही, सोनुने, तज्ज्ञ पंडित वासरे, माजी सरपंच प्रभाकर क्षीरसागर, विठ्ठलराव क्षीरसागर, विष्णू क्षीरसागर, राजेश क्षीरसागर, सुनील जोशी यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. प्रास्ताविक ॲग्रोवनचे प्रतिनिधी संतोष मुंढे यांनी केले. नियोजन वितरण प्रतिनिधी अशोक तांबाडे यांनी केले. प्रतिक्रिया... कडवंचीमधील तिसरी पिढी द्राक्ष अन् पणलोटात काम करत आहे. पाणी किती पडलं, याचं मोजमाप ठेवणाऱ्या या गावात २८ टक्के अपेक्षित असलेलं सिंचन ४२ टक्क्यांवर गेलंय. संसाधनांचे संधारण केलं, तर काय परिणाम होतात, हे दाखविणारं हे गाव आहे. - पंडित वासरे, तज्ज्ञ, केव्हीके जालना आमच्या कार्याची सर्वांगीण दखल घेणाऱ्या ॲग्रोवनमुळे आमच्या गावाचं नाव भारताच्या नकाशावर चमकलं. - विठ्ठलराव क्षीरसागर, कडवंची, जि. जालना गावात द्राक्षाची सुरुवात झाली तेव्हापासून आजवर अशी गावाची विस्तृत ओळख कुणी करून दिली नाही. सुरुवातीला केलेल्या कामाचा आज आनंद होतोय. - उत्तमराव क्षीरसागर, कडवंची, जि. जालना ॲग्रोवनने विशेषांकामुळे कडवंचीची ओळख शाश्वत द्राक्षाचं गाव म्हणून पक्की झाली. गाव आज खऱ्या अर्थानं नावारूपाला आल्याचा आनंद मिळतोय. - चंद्रकांत क्षीरसागर, सरपंच, कडवंची, जि. जालना कडवंची गावात एकात्मिक शेतीपद्धतीचे मॉडेल उभं करण्याचा प्रयत्न यापुढील काळात राहील. द्राक्षाला इतर पीकपूरक उद्योग कसे जोडले जातील, यावर काम करू. - एस. व्ही. सोनुने, प्रमुख, खरपुडी, केव्हीके जालना शेतकऱ्यांच्या कष्टातून उभं राहिलेलं कडवंची गावामुळं आम्हीही द्राक्ष शेतीकडे वळलो. शेतीबाबत नकारात्मक वातावरणात एक सक्षम सकारात्मक उदाहरण उभ्या करणाऱ्या या गावाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. - दत्तू चव्हाण, सरपंच, नंदापूर, जि. जालना  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com