अमरावतीतील दहा हजारांवर शेतकऱ्यांचे शेततळ्यांसाठी अर्ज

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अमरावती  ः निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकरी संरक्षित सिंचनाच्या पर्यायावर भर देत आहेत. त्याअंतर्गंत शेततळ्याला देखील नजीकच्या काळात पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १० हजारांवर शेतकऱ्यांनी शेततळ्यांकरिता अर्ज केले होते. यातील ८२५० अर्जांना मान्यता देण्यात आली आहे.

शेततळ्यांमुळे शेतीचा मोठा भाग यात खर्ची जातो, यामुळे शेतकऱ्यांकडून शेततळ्यांच्या योजनेला प्रतिसादच मिळत नव्हता. कृषी विभागाला शेततळ्यांचे उद्दीष्ट असल्याने त्यांच्याकडून शेतकऱ्यांची मनधरणी केली जात होती. नजीकच्या काळात मात्र शेतकऱ्यांचा या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे सुखद चित्र अनुभवायला मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे शेतकरी शेततळे व इतर संरक्षित सिंचनाचे पर्याय उभारण्यावर भर देत आहेत. जिल्ह्यात १० हजार ९६८ शेतकऱ्यांनी शेततळ्यांसाठी अर्ज केले होते. त्यापैकी ८ हजार २५० अर्ज तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे. यातील ८ हजार २३२ शेततळ्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले असून ४१ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात २० कोटी ७५ लाख ११ हजार रुपये खर्चून ४ हजार ९५६ शेततळी पूर्ण झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

दर्यापूर तालुक्‍याची आघाडी जिल्ह्यातील १४ तालुक्‍यांपैकी शेततळ्याच्या बाबतीत दर्यापूर तालुक्‍याने आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण शेततळ्यांच्या ३५ टक्‍के शेततळे दर्यापूर तालुक्‍यात झाले आहेत. १ हजार ७५६ शेततळ्यांची कामे या तालुक्यात झाली आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com