लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीत सर्वाधिक मतदान

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई   ः राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात हिंगोलीत सर्वाधिक म्हणजे ६६.६०, तर सोलापूर मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे ५८.४५ टक्के मतदान झाले आहे. दहा लोकसभा मतदारसंघात एकूण ६२.९१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी (ता. १८) राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या दहा लोकसभा मतदारसंघांत मतदान झाले होते. बहुतांश मतदारसंघात संध्याकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू असल्याने मतदानाची अंतिम आकडेवारी स्पष्ट होऊ शकली नव्हती.

राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शुक्रवारी अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार हिंगोलीनंतर बीड आणि त्याखालोखाल अमरावतीत ६३.८६ टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्प्यात दहा मतदारसंघात एकूण १ कोटी ८५ लाख मतदारांपैकी १ कोटी १६ लाख ६७ हजार ५०६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात पुरुष ६२ लाख ८६ हजार ८७९ तर ५३ लाख ८० हजार ५७५ स्त्री मतदारांचा समावेश आहे. बीड लोकसभा मतदारसंघात मतदारांची संख्या सर्वाधिक होती तेथे १३ लाख ४८ हजार ८५६ मतदारांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची अंतिम टक्केवारी  ः बुलडाणा ६३.६८,अकोला ६०, अमरावती ६३.८६,हिंगोली ६६.६०, नांदेड ६५.१५,परभणी ६३.१९, बीड ६६.०८, उस्मानाबाद ६३.४२ ,लातूर ६२.२०, सोलापूर ५८.४५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com