नगरमध्ये अजून ८९ संस्थांवर गुन्हे दाखल

नगरमध्ये अजून ८९ संस्थांवर गुन्हे दाखल
नगरमध्ये अजून ८९ संस्थांवर गुन्हे दाखल

नगर : जिल्ह्यात २०१२ ते २०१४ या दुष्काळी कालावधीत सुरू असलेल्या चारा छावणी चालविणाऱ्या सुमारे ४२६ संस्थांमध्ये अनियमितता आढळली. त्यापैकी २४५ संस्थांवर याआधीच गुन्हे दाखल झालेले आहेत. आता पुन्हा ८९ संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत ३३४ संस्थांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अजूनही ९२ संस्थांवर गुन्हे दाखल होणे बाकी आहे.

दुष्काळाच्या काळात पशुधन वाचवण्यासाठी २०१२ ते २०१४ या दुष्काळी कालावधीत जनावरांच्या छावण्या सुरू केल्या होत्या. त्यात अनियमितता आढळून आली होती. याबाबत प्रशासनाकडे तक्रारी झाल्या; पण त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने जनावरांच्या छावण्यात अनियमितता आढळल्याने छावण्या चालवणाऱ्या जिल्ह्यांमधील ४२६ संस्थांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आतापर्यंत ३३४ संस्थांवर प्रशासनाने गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईत नगर तालुक्‍यातील ५९, पारनेर ३६, पाथर्डी १४, कर्जत १३०, श्रीगोंदे ८१, जामखेड पाच व नेवासे तालुक्‍यातील नऊ चारा छावण्या चालवणाऱ्या संस्थांविरोधात महसूल प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत.

भारतीय दंड संविधान १८६० मधील कलम १८८ नुसार हे गुन्हे नोंदविले जात आहेत. अजूनही ९२ चारा छावणी चालवणाऱ्या संस्थांविरोधात गुन्हे दाखल होणे बाकी आहे. दरम्यान, या कारवाईविरोधात ६९ संस्थाचालकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. राज्यातील नगर, सोलापूर, सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांत सुमारे एक हजार २७३ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावणी चालविणाऱ्या संस्थांची तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळलेली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com