लखनौ, उत्तर प्रदेश ः कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरीप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली अाहे. ‘‘वेळ वाया घालवू नका, शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी अादी प्रश्नांकडे लक्ष घाला,’’ असा सल्ला त्यांनी सरकारला दिला अाहे.
श्री. गांधी अमेठी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून या वेळी त्यांनी अनेक मुद्यांवर केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेतले अाहे.
मनरेगा योजना कॉंग्रेस सरकारनेच अाणली. ती `एनडीए'च्या काळात अाणली नाही.
सध्या शेतकरी अात्महत्या, बेरोजगारी हे दोन प्रमुख प्रश्न अाहेत. शेतकऱ्यांना जी अाश्नासने सरकारने दिली होती; ती पूर्ण का केली नाहीत, असा सवाल श्री. गांधी यांनी उपस्थित केला अाहे.
नोटाबंदीचा निर्णय चुकीचा होता. यामुळे काहीही साध्य झालेले नाही. तुम्ही ‘मेक इन इंडिया’विषयी बोलत अाहात; मात्र सर्व काही ‘मेड इन चायना’साठी करत अाहात, अशी टीका त्यांनी केली अाहे.