शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन ः अशोक चव्हाण

शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन ः अशोक चव्हाण
शेतकऱ्यांबाबत सरकार उदासीन ः अशोक चव्हाण

कोल्हापूर : शेकडो कोटी रुपयांच्या खोट्या जाहिराती करून सरकार जनतेची फसवणूक करत आहे. न केलेल्या कामाची जाहिरात करून जनतेचा पैसा उधळण्याऐवजी एवढ्याच रकमेची कर्जमाफी केली असती, तर काही शेतकऱ्यांना तरी नक्कीच फायदा झाला असता, अशी टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी (ता. १) येथे केली.

सतेज कृषी प्रदर्शनच्या उद्‍घाटनासाठी आले असता येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारची उदासीनता आहे. खरेदी केंद्रे कुठेच सुरू नाहीत. सरकार व व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करत नसल्याने सोयाबीन, तुरीच्या किमती घसरल्या आहेत.

ऑनलाइन खरेदीचा गोंधळ कायम आहे. वीज नसणे, तासनतास रांगेत उभा राहणे यामुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया आहेत. सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. सरकारची कर्जमाफी ही फसवी आहे. याचा मोठा फटका सरकारला नजीकच्या काळात बसण्याची शक्‍यता अाहे, असे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले. श्री. चव्हाण यांनी या वेळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाचीही भेट घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com