सहकारी संस्थेविषयीआपुलकी वाढायला हवी : शरद पवार

भवानीनगर, जि. पुणे ः येथील श्री छत्रपती कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाच्या पहिल्या हंगामाचे मोळीपूजन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रेय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळा
भवानीनगर, जि. पुणे ः येथील श्री छत्रपती कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाच्या पहिल्या हंगामाचे मोळीपूजन करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रेय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळा
भवानीनगर, जि. पुणे ः अलीकडच्या काळात सभासदांची संस्थेविषयीची आपुलकीची भावना दिवसेंदिवस कमी होताना दिसत अाहे; ती वाढायला हवी, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.  
 
श्री छत्रपती कारखान्याचा विस्तारीकरण व सहवीजनिर्मिती प्रकल्पाच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाच्या पहिल्या हंगामाचे मोळीपूजनही करण्यात आले.
 
या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रेय भरणे, कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्यासह इतरही पदाधिकारी व कारखान्याचे संचालक उपस्थित होते.
 
पूर्वीच्या काळी अत्यंत शिस्तीने, काटकसरीने छत्रपती कारखाना त्या-त्या मंडळींनी चालवला. आपल्यालाही त्याच मार्गाने जायचे आहे, असे सांगत शरद पवार यांनी ६० वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.
 
श्री. पवार म्हणाले, ‘‘हा माझा कारखाना अशी पूर्वीची भावना होती. आता कोणी माझा कारखाना म्हणत नाही, तर पहिल्यांदा उचल किती देणार हे विचारतात. कारखाने दर देतातही, मात्र त्यासाठी बॅंकाचे कर्ज काढतात. उसाच्याच किमतीतून हे कर्ज फेडले जाते. त्यामुळे तुमचाच पैसा व्याजाने तुमच्याच डोक्यावर राहतो. कारखाना माझा आहे ही भावना वाढून संस्थेची निष्ठा वाढली पाहिजे.
 
पूर्वी खासगीची मक्तेदारी होती.फलटणचा कारखाना आपटेंचा. कोल्हापूर शुगर लोहियांचा, नगर जिल्ह्यातही धनिकांचे कारखाने होते. परंतु सहकारी संस्थेचे तुम्ही मालक आहात. आपल्याच कारखान्याविरोधात आंदोलन करणार असाल तर संस्था तुमचीच आहे. संस्थेच्या हिताची जपणूक करायची जबाबदारीही तुमचीच आहे.’’ 
 
कारखान्याच्या यंत्रणेसंदर्भात श्री. पवार म्हणाले, की पहिल्यांदा कारखाना ४०० टनांच्या आसपास गाळप करीत होता. तोही कारखाना तसा जुनाच होता. कारण देशातील पहिला कारखाना असलेल्या प्रवरा कारखान्याची ती मशिनरी होती. त्यावरच छत्रपती सुरू झाला. पुन्हा नवीन मशिनरी घेताना बकाऊ वुल्फचा कारखाना विकत घेतला. जुना कारखाना संगमनेरला विकला. त्यानंतर ती मशिनरी नेपाळला गेली. अशी काटकसरीची पद्धत या कारखान्याची होती, याच रस्त्याने आपल्याला जायचे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com