साडेचार लाख टन तुरीची महाराष्ट्रात खरेदी होणार

तूर
तूर

मुंबई  ः महाराष्ट्र हे देशात महत्त्वाचे तूर उत्पादक राज्य आहे. राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन घेतात; परंतु तूर एकदा बाजारात आली की दर पडतात. यंदाही तोच अनुभव सध्या शेतकरी घेत आहेत. हमीभाव ५४५० असताना बाजारात मात्र तूर ३८०० रुपयांपासून खरेदी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याला ४ लाख ४६ हजार ८०० टन तूर हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत. खरेदी संस्थांशी करार झाल्यानंतर राज्यात खरेदी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.  बाजारात तुरीचे दर हमीभावाच्या खाली गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. शासनाने खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्याला हमीभावाने ४ लाख ४६ हजार ८०० टन तूर खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. ही तूर ९० दिवसांत खरेदी करायची आहे. तुरीची महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या अकोला बाजारात सोमवारी (ता. २२) तुरीला ४१०० रुपये दर मिळाला, हा दर ५४५० या हमीभावापेक्षा खूपच कमी होता. शासनाच्या खरेदी संस्थांशी करार झाल्यानंतर राज्यात खरेदी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी महाराष्ट्र सरकारने ५ लाख ७५ हजार टन तूर हमीभावाने खरेदी केली होती. तर पॅन-इंडियाने दीड लाख टन खरेदी केली होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com