कोणी कृषी विकास अधिकारी देता का हो...

कोणी कृषी विकास अधिकारी देता का हो...
कोणी कृषी विकास अधिकारी देता का हो...

यवतमाळ : कीटकनाशक फवारणी विषबाधा बळी प्रकरणात कामात कुचराई झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी दत्तात्रेय कळसाईत यांचे निलंबन करण्यात आले. याला चार महिन्यांचा कालावधी लोटला असताना, पूर्णवेळ कृषी विकास अधिकाऱ्याची नियुक्‍ती केली गेली नाही.  या दुर्घटनेत २२ शेतकरी, शेतमजुरांना या घटनांमध्ये आपले प्राण गमवावे लागले. याचे देशभरात पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, राज्यमंत्री सदाशिव खोत, आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह अनेकांनी धाव घेत या प्रकरणांचा आढावा घेतला. चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली. त्यातही रिक्‍त पदांचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असताना आत्महत्याग्रस्त आणि त्यानंतर आता विषबाधा बळींचा जिल्हा असलेल्या यवतमाळात मात्र चार-चार महिने महत्त्वाची पदे रिक्‍त ठेवली जात असल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.  खरिप हंगाम तोंडावर आहे. जिल्ह्याकरिता निविष्ठा पुरवठ्याचे नियोजनाचा आराखडा कृषी विकास अधिकाऱ्याच्या माध्यमातून तयार होतो. परंतु जिल्ह्याला पूर्णवेळ कृषी विकास अधिकारीच नसल्याने हे काम प्रभावित होण्याची भीती वर्तविली जात आहे. कळसाईत यांच्या निलंबनानंतर सुमारे पंधरा दिवस त्यांचा प्रभार घेण्यासाठी कोणीच तयार होत नव्हते. अखेर उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखडे यांना दोन महिन्यांकरिता पदभार स्वीकारण्यास सांगण्यात आले. मात्र, अद्यापही पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी देण्याबाबत स्पष्टता नसल्याचे समोर अाले अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com