फळ पीकविम्याकडे पुण्यातील शेतकऱ्यांनी फिरवली पाठ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : यंदा खरीप हंगामात मृग बहरासाठी शासनामार्फत पुनर्रचित हवामान आधारित पीकविमा योजना राबविण्यात आली होती; परंतु या विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. फळ पीकविमा योजनेत अवघे १५४३ शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यांनी ६२ लाख ७४ हजार ७८५ रक्कम भरली असून शंभर टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना १२ कोटी ६१ लाख ५५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या फळबागांना विमासंरक्षण देणे हा मुख्य उद्देश या योजनेचा होता. त्यासाठी डाळिंब, पेरू, चिकू या पिकांसाठी अधिसूचित केलेल्या महसूल मंडळांमध्ये योजना राबविण्यात आली होती. डाळिंबासाठी १४ जुलै, पेरूसाठी १४ जून, चिकूसाठी ३० जून ही अंतिम मुदत होती. यंदा डाळिंबासाठी साडेपाच हजार, पेरू व चिकूसाठी अडीच हजार रुपयांचा विमा हप्ता ठरविण्यात आला होता. डाळिंब, पेरू आणि चिकूचे नुकसान झाल्यानंतर डाळिंबासाठी एक लाख १० हजार, पेरूसाठी ५० हजार, चिकूसाठी दोन लाख ४३ हजार रुपयांचे विमा संरक्षित रक्कम देण्यात येणार आहे.

योजना कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य, बिगर कर्जदार शेतकऱ्यासाठी ऐच्छिक स्वरूपाची होती. परंतु दरवर्षी विमा हप्ता भरूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसल्याकारणाने यंदा बहुतांशी शेतकऱ्यांनी विमा हप्ता भरलेला नाही. त्यातच विमा रक्कम भरण्यासाठी असलेल्या अडचणी, कमी कालावधी असल्याने बहुतांशी शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिल्याचे चित्र आहे.  

चालू वर्षी हवेली, खेड, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी तालुक्यातील एकही शेतकरी सहभागी झालेला नाही; तर आंबेगाव, दौंड, इंदापूर तालुक्यातील सहभागी झालेल्या शेतकऱ्याची संख्या अवघी बोटावर मोजण्याएवढी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com