'सोयाबीनला एकरी पाच हजार रुपये अनुदान द्या'

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी अडचणीत आला आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने सोयाबीन उत्पादकांना एकरी पाच, तर कापूस उत्पादकांना क्विंटलला १५०० रुपये अनुदान दिले जावे, अशी मागणी येथील खासदार संजय धोत्रे, अामदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अाहे.

या वर्षी खरीप हंगामातील पिकांना लहरी पावसामुळे मोठा फटका बसल्याने उत्पादन घटले आहे. विशेषतः सोयाबीनचे नुकसान अधिक झाले आहे. त्यामुळे शासकीय खरेदी तसेच मिळणारा बोनस इत्यादी लाभांपासून शेतकरी नाइलाजाने वंचित राहिला आहे. शेतकऱ्याला आर्थिक संकटातून बाहेर  काढावे, याकरिता खासदार, अामदारांनी मुख्यमंत्र्यांना साकडे घातले.

शेतकऱ्यांच्या पेरे पत्रकानुसार शेतकऱ्यांना प्रतिएकर पाच हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रत्यक्ष भेटून केली. त्याबरोबर खरिपातील तूर, मूग, कपाशी इत्यादी उत्पादनाला जास्तीत जास्त बोनस देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत खासदार संजय धोत्रे यांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करण्याचे अाश्‍वासन दिले.

या वर्षी सोयाबीन पिकाला केंद्र शासनाचा हमीभाव २८५० अधिक बोनस २०० रुपये असा ३०५० प्रतिक्विंटल भाव असताना बाजारात प्रत्यक्ष सरासरी २३०० रुपये प्रतिक्विंटलचे भाव आहेत. परिस्थिती लक्षात घेता राज्यात हमीभाव अधिक ५०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याची मागणी आमदार सावरकर यांनी केली अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com