सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले एफआरपीचे पैसे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करावेत, तसेच संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, यांसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष महामूद पटेल, जिल्हा सचिव उमाशंकर पाटील, वसंत गायकवाड, पोपट साठे, राजेंद्र लांडे, नरेंद्र पाटील, इक्बाल मुजावर, शिवण्णा रामशेट्टी, रेवण्णप्पा बनसोडे, गजानन घोडके आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या हंगामात जवळफास १ कोटी ६९ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र, गाळपास गेलेल्या उसाची पहिली उचल एफआरपीच्या कायद्यानुसार अद्यापही जिल्ह्यातील ३० पैकी २५ कारखान्यांनी थकवली आहे. कायदेशीरदृष्ट्या कारखानदारांची ही भूमिका चुकीची आणि बेकायदेशीर आहे. या कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना अदा करणे आवश्यक आहे. पण त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. शासन केवळ नोटिसा बजावून सोपस्कार पूर्ण करत आहे, पण या कारखानदारांकडून वसुली आणि कायदेशीर कारवाईबाबत कचरत आहे, हे चुकीचे आहे. याबाबत लवकरात लवकरच लक्ष घालून पैसे द्यावेत, अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन करू, असा इशारा जिल्हाध्यक्ष पटेल यांनी या वेळी दिला. या आहेत मागण्या....
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.