नवी दिल्ली : देशातील ऊस पीकक्षेत्रात वाढ झाल्याने यंदाच्या (२०१७-१८) हंगामातून २४.५-२५ दशलक्ष टन साखर उत्पादन अपेक्षित अाहे, असा अंदाज अन्न मंत्रालयाच्या सूत्रांनी व्यक्त केला अाहे.
गेल्या वर्षी २०.२ दशलक्ष टनांपर्यंत साखर उत्पादन खाली अाले होते. मात्र, यंदा त्यात वाढ होणार असल्याचे संकेत देण्यात अाले अाहेत. यंदा देशातील ऊस उत्पादन ३०६.७ दशलक्ष टनांवरून ३३७.७ दशलक्ष टनांवर पोचेल, असा पहिला अागाऊ पीक उत्पादन अंदाज कृषी मंत्रालयाने जाहीर केला अाहे.
तर कृषी मंत्रालयाने अाॅक्टोबरपासून सुरू होणाऱ्या हंगामातून २४.६ दशलक्ष टन साखर उत्पादन मिळेल, असा अंदाज व्यक्त केला अाहे. तर राज्य साखर अायुक्तालयाने २५.८ दशलक्ष टनांपर्यंत साखर उत्पादन पोचणार असल्याचे संकेत दिले अाहेत.
दरम्यान, अागामी ऊसगाळप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अन्न मंत्रालयाने महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तमिळनाडू अाणि उत्तराखंडमधील साखर उत्पादनाचा अंदाजाचा अाढावा घेण्याची सूचना केली अाहे, अशी माहिती सूत्रांनी दिली अाहे.
महाराष्ट्रातील उत्पादन ६.८ दशलक्ष टनांपर्यंत
महाराष्ट्रातील साखर उत्पादन ७.३५ दशलक्ष टनांपर्यंत पोचेल, असा अंदाज यापूर्वी व्यक्त केला होता. मात्र, पाऊस उशिरा सुरू झाल्याने ऊस उत्पादन अाणि साखर उताऱ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता अाहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उत्पादन ६.६-६.८ दशलक्ष टनांपर्यंत खाली येऊ शकते, असा सुधारित अंदाज व्यक्त केला अाहे.
उत्तर प्रदेशात ऊसक्षेत्रात वाढ; मात्र उतारा कमीच
साखर उत्पादनात देशात अाघाडी घेतलेल्या उत्तर प्रदेशात २०१६-१७ मधील हंगामात १०.३ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला होता. या राज्यांतील ऊस पीकक्षेत्रात वाढ झाली अाहे. मात्र साखर उताऱ्यात सुधारणा झालेली नाही.
गेल्या हंगामात येथील साखर उतारा १०.६१ टक्के होता. गेल्या वर्षी उत्तर प्रदेशातील १५ टक्के उसाचा वापर गूळ, खडीसाखर करण्यासाठी केला होता. यंदा एकूण ऊस उत्पादनाच्या अंदाजानुसार ठराविक उसाचा गुळासाठी वापर होईल, असे अन्न मंत्रालयातील सूत्रांनी म्हटले अाहे. कर्नाटकात २.६ दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज अाहे.