तूर, हरभऱ्याला सरकारचा ‘भावांतर’ दिलासा

तूर, हरभऱ्याला सरकारचा ‘भावांतर’ दिलासा
तूर, हरभऱ्याला सरकारचा ‘भावांतर’ दिलासा

मुंबई : ज्या शेतकऱ्यांची तूर-हरभऱ्याची नोंदणी झाल्यानंतरही विकत घेता आली नाही, त्यांना १ हजार रुपये प्रतिक्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. १५ वर्षांत जेवढी खरेदी झाली नाही तेवढी खरेदी आमच्या सरकारने केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.   पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची १६० कोटींची अनुदानाची रक्कम देण्याचा निर्णय दूध भुकटी निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय विचाराधीन आहे, त्यासाठी अभ्यास गट तयार केला आहे. शरद पवार यांनी आंदोलनाला पाठिंबा देत, शेतकऱ्यांना आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले होते. याविषयीच्या प्रश्‍नावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपली विश्वासार्हता गमावली आहे. शेतकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास नाही म्हणून हे पक्ष शेतकऱ्यांच्या मागे लपून आंदोलन करत आहे.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com