सोयाबीनच्या टंचाईची सरकारला चिंता

सोयाबीन
सोयाबीन

नवी दिल्ली ः तेलबियांचे उत्पादन २०१८-१९ मध्ये ३.६ कोटी टनांवर नेण्याचे उद्दिष्ट असले तरी यात महत्त्वाची भूमिका असलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची टंचाईची चिंता कृषी खात्याला आहे. सुमारे ९३ हजार किलो बियाण्यांची करमरता भरून काढण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत.  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगण या राज्यांमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेल्या बिगरमोसमी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे ९३,१७० किलोग्राम सोयाबीन बियाण्यांची कमतरता जाणवत असल्याचे कृषी आयुक्त डॉ. एस. के. मल्होत्रा यांचे म्हणणे आहे. बियाणे कमतरतेवर मात करण्याचे प्रयत्न सुरू असून, शेतकऱ्यांनी साठविलेल्या सोयाबीन बियाण्याचा ‘बीज प्रक्रिया’ करून वापर करावा, असा सल्ला कृषी खात्याने दिला आहे.  सोयाबीन, भूईमूग, तीळ, सूर्यफूल, एरंड आदी तेलबियांचे २०१७-१८ मध्ये उत्पादन ३ कोटी टनांपर्यंत पोचण्याचा सरकारचा अंदाज आहे. नव्या वर्षात पावसाच्या अनुकूल अंदाजामुळे तेलबियांचे उत्पादन साठ लाख टनांनी म्हणजेच ३.६ कोटी टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य सरकारने ठरविले आहे. विशेषतः धानाचे उत्पादन कमी होणाऱ्या क्षेत्रात तेलबियांचे उत्पादन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी यात सोयाबीनवर भर देताना सरकारने पारंपरिक लागवड क्षेत्र वगळता बिहार, झारखंड, ओडिशा या राज्यांमध्येही सोयाबीनचे क्षेत्र विस्तारण्याचे नियोजन आखले आहे. मात्र सोयाबीनच्या बियाण्याची टंचाई सरकारला भेडसावत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com