सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदशील ः वाघ

सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदशील ः वाघ
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदशील ः वाघ

परभणी ः केंद्र आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाचे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूचे नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर असंवेदनशील आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नेतेमंडळींनी पीकविमा परताव्याचा प्रश्न विधिमंडळात मांडला आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी येथे सांगितले.

पीकविमा परतावाप्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ जूनपासून उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांची शुक्रवारी (ता. १३) चित्राताई वाघ यांनी भेट घेतली. या वेळी त्या म्हणाल्या, रिलायन्स कंपनीने परभणीसह अन्य जिल्ह्यांतील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. त्यामुळे या कंपनीवर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे आवश्यक आहे. या विषयांवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लोकप्रतिनिधी विधीमंडळामध्ये बाजू मांडत आहेत. परंतु सरकार शेतकऱ्यांसह अन्य समाज घटकांच्या बाबतीत असंवदेशील असल्यामुळे देशात वाईट परिस्थिती आहे.

संसदेच्या अधिवेशनात विमा परताव्याचा प्रश्न मांडला जाईल. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्ज्वला राठोड, उपाध्यक्षा भावनाताई नखाते, विलास बाबर, राजन क्षीरसागर, श्रीनिवास जोगदंड, प्रा. किरण सोनटक्के, संतोष देशमुख, सोनाली देशमुख आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com