सरकार कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कीटकनाशक फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे शेतकरी, शेतमजुरांचे मृत्यू झाले. त्यानंतर "आप''ने केलेले आंदोलन व जनहित याचिकेमुळे विशेष तपास समिती (एसआयटी) स्थापन करण्यात आली. समितीने अहवाल राज्य शासनाला दिला. मात्र, अजूनही तो अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात सरकार काम करीत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे राज्याचे पक्षप्रमुख ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला.

विषबाधा प्रकरणाला चार महिने लोटले आहे. अजूनही शासनाने एकाही जबाबदार प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही. बी.टी. बियाणे कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहेत. अशी गंभीर स्थिती असताना शासन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात कारवाई करणे तर दूरच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई दिली नाही. यावरून राज्य शासन कीटकनाशक कंपन्यांच्या दबावात असल्याचा आरोप सावंत यांनी केला.

मोनोक्रोटोफोस सारखे जीव घेणारे घटक जे रासायनिक युद्धात वापरल्या जातात, अशा प्रकारचे घटक किटकनाशकामध्ये वापरल्या जात आहे. कीटकनाशक फवारणीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला नाही, असे कीटकनाशक कंपनीचे क्रॉप केयर फाउंडेशन सांगत आहे. त्यामुळे हा दावा खोटा असल्याचे ब्रिगेडिअर सुधीर सावंत म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com