शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर सरकारला घेरणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : येत्या २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर फडणवीस सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेसने आज घेतला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ पक्षाची आज दुपारी विधान भवनातील काँग्रेस विधिमंडळ पक्ष कार्यालयात बैठक झाली.

या बैठकीला विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील गटनेते आमदार शरद रणपिसे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये प्रामुख्याने अधिवेशनाबाबत रणनीतीवर चर्चा झाली. राज्यातील ज्वलंत समस्या, अधिवेशनातील संभाव्य मुद्दे व चर्चेचा प्राधान्यक्रम, तसेच विविध आघाड्यांवर सरकारचे अपयश आदींबाबतही या वेळी विचारविनिमय करण्यात आला.

शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी, बोंड अळी व तुडतुड्यामुळे झालेल्या नुकसानाची अद्याप भरपाई न मिळणे, हमीभाव, नुकतीच झालेली गारपीट, मुंबई व राज्याच्या अन्य शहरी भागातील वाढत्या समस्या, भ्रष्टाचार, शिक्षण, बेरोजगारी, सरकारकडून सातत्याने होणारे इव्हेंट आदींसह इतर अनेक विषय या अधिवेशनात लावून धरण्याच्या सूचना या बैठकीत मांडण्यात आल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com