रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य : देशमुख

रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य : देशमुख
रेशीम शेतकऱ्यांना सरकारचे अर्थसाह्य : देशमुख

नागपूर : नव्याने रेशीम शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात शासनाकडून अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा सहकार व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

महारेशीम अभियानाचे उद्‌घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव अतुल पाटणे, आयकर उपायुक्‍त संजय धिवरे, बॅंकेचे प्रतिनिधी सुभाष भेंडे, रेशीम संचालक भाग्यश्री बानायत उपस्थित  होत्या. 

देशमुख म्हणाले, उसाप्रमाणे रेशीम शेती करण्यास इच्छुक शेतकऱ्यांना सहकारी संस्था, बॅंकामार्फत कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली जाईल. दुसऱ्या वर्षीपासून शेतकऱ्यांनी स्वतः सहभाग घ्यावा. रेशीम शेतीचा पीकविमा योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार येईल. ऊस हे शाश्‍वत भाव देणारे पीक आहे. तरी त्यापासून मिळणारे उत्पादन कमी असते. तुलनेत रेशीम शेतीला लागणारा खर्च हा उत्पादनापेक्षा कमी असतो. त्यामुळे ही शेती नफा मिळवून देते.

हातमाग उद्योगाला निधी उपलब्ध करून देणार आहे. येत्या काळात रेशीम उद्योग व हातमाग यांच्या सहकार्याने स्थानिक पातळीवरून देशपातळीवर  विकास साधण्यासाठी विपणन व्यवस्थेला चालना देण्याचे कार्य करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचा गौरव रेशीम शेतीच्या माध्यमातून संपन्नतेकडे वाटचाल करणाऱ्या अविनाश वाट, संदीप निखाडे, वामन डहारे, यशवंत ठाकरे, कालीदास बावणे, रवींद्र पंडीत, डॉ. संतोष थोटे, विजय पाटील यांच्यासह ३० शेतकऱ्यांचा गौरव महारेशीम अभियानानिमित्त करण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com